Friday, April 2, 2021

CM Uddhav Thackeray Addressing State about Lock Down on 02 04 2021 P3


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना खालील मुद्दे मांडले :

 

मधल्या काळात आपण सर्वजण मिळून या व्हायरसला रोखण्यात यशस्वी झालो होतो. पण आपण सगळे हातात हात घालून लढलो म्हणून ते शक्य झाले.

संपूर्ण जगाचीच परिस्थिती डोलायमान आहे.

……………………

मधल्या काळात आपण शिथील झालो. शस्त्र टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मी तेव्हाही सांगत होतो, की थोडा धीर धरा.

जी भीती मलाच नव्हे, तर या विषयातल्या तज्ज्ञांना वाटत होती, ती खरी ठरली.

हा विषाणू नवा अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकत आहे आणि आपली परीक्षा पाहात आहे.

…………………..

कोविडची साथ सुरू झाली तेव्हा या विषाणूंची चाचणी होऊ शकते अशा दोनच प्रयोगशाळा राज्यात होत्या

आज त्या चाचण्या करणाऱ्या जवळपास ५०० लॅब्ज आपण तयार केल्या आहेत.

मुंबईत दररोज सुमारे ५०००० चाचण्या करत आहोत.

महाराष्ट्रामध्ये दर दिवशी चाचण्या करण्याची क्षमता आपण जवळपास १८२००० पर्यंत नेली आहे

………………………………

येत्या काही दिवसांत दररोज चाचण्यांची संख्या अडीच लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

केंद्राच्या नियमावलीनुसार ७० टक्के चाचण्या आर. टी. पी. सी. आर पद्धतीने केल्या जातील.

चाचण्या करताना आपण दर्जाशी तडजोड करत नाही आणि करणार नाही.

मुख्य म्हणजे आपण एकही रूग्ण लपवलेला नाही आणि लपवणार नाही.

…………………………

महाराष्ट्रातल्या बेड्सची संख्या १०००० पेक्षा कमी होती. आता ती संख्या पावणेचार लाखांपर्यंत नेली आहे

मुंबईमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीला दर दिवशी ३००-३५० रुग्ण सापडत होते. आज ती संख्या एका महिन्यात ८५०० वर गेली आहे

विलगीकरणासाठी २,२०,००० बेड्स असून त्यापैकी ६२ टक्के बेड्स भरले आहेत.

………………………

आयसीयू बेड्स २०५१९ आहेत व ते ४८ टक्के भरलेले आहेत.

ऑक्सिजनचे बेड्स ६२ हजारांच्या आसपास आहेत आणि आज २५ टक्क्यांच्या आसपास भरलेले होते.

व्हेंटिलेटर्स ९३४७ आहेत आणि ते पण जवळपास २५ टक्क्यांच्या जवळपास भरलेले आहेत.

ही परिस्थिती अशीच राहिली तर या सुविधा लवकरच अपुऱ्या पडतील.

………………………

व्हेंटिलेटर्स, बेड्स, औषधांचा साठा, ऑक्सिजन इत्यादी सुविधा आपण वाढवू

पण डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची संख्या कशी वाढवणार

आरोग्यसेवेत काम करणाऱ्या अनेकांना कोविड होऊन गेला. पण बरे झाल्यानंतर ते लगेच सेवेत रूजू झाले आहेत. त्यांना किती त्रास द्यायचा याचा विचार करायला हवा.

…………………………..

लसीकरणात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य ठरले. काल एका दिवसात ३ लाख लसीकरण केले.

केंद्राने लसींचा पुरवठा वाढवला तर लसीकरणाची क्षमता एका दिवसात ६ ते ७ लाखांपर्यंत नेऊ.

लस घेतल्यानंतरही काही जण कोरोनाने बाधित होतात. कारण लस घेतल्यानंतरही मास्क घालणं अनिवार्य आहे पण बरेच जण हे पाळत नाहीत

………………………..

जे म्हणतात की लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरू, माझं म्हणणं आहे की जरूर उतरा पण लॉकडाऊनच्या विरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात उतारा.

डॉक्टरांना मदत करायला रस्त्यावर उतरा, ज्या कुटुंबांमध्ये कर्त्या-करवित्यांचा मृत्यू झाला आहे त्यांची जबाबदारी घेण्यासाठी रस्त्यावर उतरा.

………………………….

आपली यंत्रणा एका बाजूला ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंगमध्ये बिझी आहे. दुसरीकडे उपचार आहेत, तिसरीकडे हीच यंत्रणा लसीकरण करतेय.

हे सगळं एकत्रित आल्यानंतर त्यांची काय स्थिती होत असेल याचा आपण विचार करायला हवा.

मास्क न वापरण्यात शूरता नाही, मास्क लावायला लाजायची सुद्धा काही गरज नाहीए.

…………………….

लॉकडाउन आपण टाळू शकतो, पण ज्या जिद्दीने पहिल्यांदा लढलात, त्या जिद्दीनं पुन्हा एकदा लढायला हवं. प्रत्येकानं मी कोरोनाला हरवणार की नाही, रोखणार की नाही हे ठरवलं पाहिजे.

अजूनही कोरोनानं आपल्यावर मात केलेली नाही आणि मी करूही देणार नाही. पण ही मात करताना जर आपण घट्ट उभे राहायला हवे.

………………………

सरकार जी पावलं उचलतं आहे, ती जनतेच्या हितासाठी उचलतं आहे. अर्थचक्र फिरवायचं आहे, गरीबाची रोजीरोटी वाचवायची आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला त्यांचे जीव वाचवायचे आहेत.

मी तुमच्या कुटुंबातला एक आहे. तुम्ही मला कुटुंबीय मानलं आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, म्हणजे माझे कुटुंब तुम्ही आहात.

……………………….

माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतल्यानंतर मला टीकेची पर्वा नाही

सरकार यंत्रणेच्या बाबतीत कुठेही कमी पडलेलं नाही, कमी पडू देणार नाही. सरकार खंबीर आहे. आरोग्यसुविधा कुठेही कणभरही कमी पडू देणार नाही.

मात्र, टाळी एका हाताने वाजणार नाही. हात हातात घालून जेव्हा आपण काम करू तर आणि तरच यश मिळेल

…………………

मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देत आहे, लॉकडाऊन जाहीर करत नाहीए, पण दोन दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊ.

मला आपल्या सहकार्याची अपेक्षा नाही विश्वास आहे.

सर्व राजकीय पक्ष, सर्व धर्मियांचे सहकार्य अपेक्षित आहे.

ही लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा.

जय हिंद, जय महाराष्ट्र!


CM Uddhav Thackeray Addressing State about Lock Down on 02/04/2021 Part 1


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना खालील मुद्दे मांडले :

 

मधल्या काळात आपण सर्वजण मिळून या व्हायरसला रोखण्यात यशस्वी झालो होतो. पण आपण सगळे हातात हात घालून लढलो म्हणून ते शक्य झाले.

संपूर्ण जगाचीच परिस्थिती डोलायमान आहे.

……………………

मधल्या काळात आपण शिथील झालो. शस्त्र टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मी तेव्हाही सांगत होतो, की थोडा धीर धरा.

जी भीती मलाच नव्हे, तर या विषयातल्या तज्ज्ञांना वाटत होती, ती खरी ठरली.

हा विषाणू नवा अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकत आहे आणि आपली परीक्षा पाहात आहे.

…………………..

कोविडची साथ सुरू झाली तेव्हा या विषाणूंची चाचणी होऊ शकते अशा दोनच प्रयोगशाळा राज्यात होत्या

आज त्या चाचण्या करणाऱ्या जवळपास ५०० लॅब्ज आपण तयार केल्या आहेत.

मुंबईत दररोज सुमारे ५०००० चाचण्या करत आहोत.

महाराष्ट्रामध्ये दर दिवशी चाचण्या करण्याची क्षमता आपण जवळपास १८२००० पर्यंत नेली आहे

………………………………

येत्या काही दिवसांत दररोज चाचण्यांची संख्या अडीच लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

केंद्राच्या नियमावलीनुसार ७० टक्के चाचण्या आर. टी. पी. सी. आर पद्धतीने केल्या जातील.

चाचण्या करताना आपण दर्जाशी तडजोड करत नाही आणि करणार नाही.

मुख्य म्हणजे आपण एकही रूग्ण लपवलेला नाही आणि लपवणार नाही.

…………………………

महाराष्ट्रातल्या बेड्सची संख्या १०००० पेक्षा कमी होती. आता ती संख्या पावणेचार लाखांपर्यंत नेली आहे

मुंबईमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीला दर दिवशी ३००-३५० रुग्ण सापडत होते. आज ती संख्या एका महिन्यात ८५०० वर गेली आहे

विलगीकरणासाठी २,२०,००० बेड्स असून त्यापैकी ६२ टक्के बेड्स भरले आहेत.

………………………

आयसीयू बेड्स २०५१९ आहेत व ते ४८ टक्के भरलेले आहेत.

ऑक्सिजनचे बेड्स ६२ हजारांच्या आसपास आहेत आणि आज २५ टक्क्यांच्या आसपास भरलेले होते.

व्हेंटिलेटर्स ९३४७ आहेत आणि ते पण जवळपास २५ टक्क्यांच्या जवळपास भरलेले आहेत.

ही परिस्थिती अशीच राहिली तर या सुविधा लवकरच अपुऱ्या पडतील.

………………………

व्हेंटिलेटर्स, बेड्स, औषधांचा साठा, ऑक्सिजन इत्यादी सुविधा आपण वाढवू

पण डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची संख्या कशी वाढवणार

आरोग्यसेवेत काम करणाऱ्या अनेकांना कोविड होऊन गेला. पण बरे झाल्यानंतर ते लगेच सेवेत रूजू झाले आहेत. त्यांना किती त्रास द्यायचा याचा विचार करायला हवा.

…………………………..

लसीकरणात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य ठरले. काल एका दिवसात ३ लाख लसीकरण केले.

केंद्राने लसींचा पुरवठा वाढवला तर लसीकरणाची क्षमता एका दिवसात ६ ते ७ लाखांपर्यंत नेऊ.

लस घेतल्यानंतरही काही जण कोरोनाने बाधित होतात. कारण लस घेतल्यानंतरही मास्क घालणं अनिवार्य आहे पण बरेच जण हे पाळत नाहीत

………………………..

जे म्हणतात की लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरू, माझं म्हणणं आहे की जरूर उतरा पण लॉकडाऊनच्या विरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात उतारा.

डॉक्टरांना मदत करायला रस्त्यावर उतरा, ज्या कुटुंबांमध्ये कर्त्या-करवित्यांचा मृत्यू झाला आहे त्यांची जबाबदारी घेण्यासाठी रस्त्यावर उतरा.

………………………….

आपली यंत्रणा एका बाजूला ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंगमध्ये बिझी आहे. दुसरीकडे उपचार आहेत, तिसरीकडे हीच यंत्रणा लसीकरण करतेय.

हे सगळं एकत्रित आल्यानंतर त्यांची काय स्थिती होत असेल याचा आपण विचार करायला हवा.

मास्क न वापरण्यात शूरता नाही, मास्क लावायला लाजायची सुद्धा काही गरज नाहीए.

…………………….

लॉकडाउन आपण टाळू शकतो, पण ज्या जिद्दीने पहिल्यांदा लढलात, त्या जिद्दीनं पुन्हा एकदा लढायला हवं. प्रत्येकानं मी कोरोनाला हरवणार की नाही, रोखणार की नाही हे ठरवलं पाहिजे.

अजूनही कोरोनानं आपल्यावर मात केलेली नाही आणि मी करूही देणार नाही. पण ही मात करताना जर आपण घट्ट उभे राहायला हवे.

………………………

सरकार जी पावलं उचलतं आहे, ती जनतेच्या हितासाठी उचलतं आहे. अर्थचक्र फिरवायचं आहे, गरीबाची रोजीरोटी वाचवायची आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला त्यांचे जीव वाचवायचे आहेत.

मी तुमच्या कुटुंबातला एक आहे. तुम्ही मला कुटुंबीय मानलं आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, म्हणजे माझे कुटुंब तुम्ही आहात.

……………………….

माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतल्यानंतर मला टीकेची पर्वा नाही

सरकार यंत्रणेच्या बाबतीत कुठेही कमी पडलेलं नाही, कमी पडू देणार नाही. सरकार खंबीर आहे. आरोग्यसुविधा कुठेही कणभरही कमी पडू देणार नाही.

मात्र, टाळी एका हाताने वाजणार नाही. हात हातात घालून जेव्हा आपण काम करू तर आणि तरच यश मिळेल

…………………

मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देत आहे, लॉकडाऊन जाहीर करत नाहीए, पण दोन दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊ.

मला आपल्या सहकार्याची अपेक्षा नाही विश्वास आहे.

सर्व राजकीय पक्ष, सर्व धर्मियांचे सहकार्य अपेक्षित आहे.

ही लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा.

जय हिंद, जय महाराष्ट्र!


Saturday, March 27, 2021

Huge Fire Broken out at Sunrise Hospital part 1

Huge Fire Broken out at Sunrise Hospital 3rd floor of Dreams Mall, Bhandup West, it is Owned by Daughter of HDIL Builder, BMC has given illegal conditional OC to Sunrise Hospital for Covid said Ex MP Dr. Kirit Somaiya.
72 Patients Were Admitted in this hospital from that till now
12 People Died due to Suffocation Declared By BMC

Huge Fire Broken out at Sunrise Hospital part 2

Huge Fire Broken out at Sunrise Hospital 3rd floor of Dreams Mall, Bhandup West, it is Owned by Daughter of HDIL Builder, BMC has given illegal conditional OC to Sunrise Hospital for Covid said Ex MP Dr. kirit Somaiya.
72 Patients Were Admitted in this hospital from that till now
12 People Died due to Suffocation Declared By BMC


Wednesday, March 10, 2021

जागतिक महिला दिनी महिला पोलीसांशी डॉक्टरांचा आरोग्य संवाद!


मुलुंड : ८ मार्च २०२१ : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य विषयी एक परिसंवाद  पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ अंतर्गत चंदन बाग हॉल मुलुंड पश्चिम येथे आयोजित करण्यात आला होता.  हिरानंदानी हॉस्पिटलच्या प्रसूति आणि  स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. राखी साहू या प्रमुख वक्त्या होत्या.

डॉ. राखी साहू यांनी स्त्री रोगाबद्दल कस जागरूक रहायच व काळजी घ्यायची त्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीमती जुबेदा शेख, यांनी एक स्त्री शक्तीचे उदाहरण देतांना चिन्धी नावाच्या मुलीची  गोष्ट सांगितली आणि महिलांना प्रोत्साहित केले. तसेच शुभदा चव्हाण यांनी सुद्धा अनेक स्त्री शक्तीच्या गोष्टीमांडून स्त्रियांना सक्षम व्हावे असे सांगितले.

 कार्यक्रमात श्री रमेश ढसाळ व. पो. नि., मुलुंड पोलीस ठाणे, शुभदा चव्हाण, व. पो. नि., विक्रोळी पोलीस ठाणे तसेच श्रीमती जुबेदा शेख, व. पो. नि., पार्कसाईट पोलीस ठाणे, ए.एस.आई. विष्णू मालवे, मिल स्पेशल मुलुंड पोलीस ठाणे, मुलुंड न्यायालयाचे सरकारी वकील, राजेश्री विर्कुट व मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ च्या विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले महिला अधिकारी, अंमलदार व शिपाही तसेच ट्राफिक पोलीसमधून ही महिला अंमलदार तसेच अग्निशामक दलाचे महिला अधिकारी उपस्थित होते.


Monday, March 8, 2021

जागतिक महिला दिनी महिला पोलीसांशी डॉक्टरांचा आरोग्य संवाद!


मुलुंड : ८ मार्च २०२१ : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य विषयी एक परिसंवाद  पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ अंतर्गत चंदन बाग हॉल मुलुंड पश्चिम येथे आयोजित करण्यात आला होता.  हिरानंदानी हॉस्पिटलच्या प्रसूति आणि  स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. राखी साहू या प्रमुख वक्त्या होत्या.

डॉ. राखी साहू यांनी स्त्री रोगाबद्दल कस जागरूक रहायच व काळजी घ्यायची त्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीमती जुबेदा शेख, यांनी एक स्त्री शक्तीचे उदाहरण देतांना चिन्धी नावाच्या मुलीची  गोष्ट सांगितली आणि महिलांना प्रोत्साहित केले. तसेच शुभदा चव्हाण यांनी सुद्धा अनेक स्त्री शक्तीच्या गोष्टीमांडून स्त्रियांना सक्षम व्हावे असे सांगितले.

 कार्यक्रमात श्री रमेश ढसाळ व. पो. नि., मुलुंड पोलीस ठाणे, शुभदा चव्हाण, व. पो. नि., विक्रोळी पोलीस ठाणे तसेच श्रीमती जुबेदा शेख, व. पो. नि., पार्कसाईट पोलीस ठाणे, ए.एस.आई. विष्णू मालवे, मिल स्पेशल मुलुंड पोलीस ठाणे, मुलुंड न्यायालयाचे सरकारी वकील, राजेश्री विर्कुट व मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ च्या विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले महिला अधिकारी, अंमलदार व शिपाही तसेच ट्राफिक पोलीसमधून ही महिला अंमलदार तसेच अग्निशामक दलाचे महिला अधिकारी उपस्थित होते.























Tuesday, February 23, 2021

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the state


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील मुद्दे मांडले :

बरेच दिवस आपल्याला भेटलो नाही. आज आपल्या भेटीला येण्याचं कारण कळलं असेलच. कोरोनाव्यतिरिक्त आपली भेट घ्यावी हे मनात होतंच. कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्रात झाला त्याला जवळपास वर्ष होत आलं.तेव्हा मी आपल्याशी संवाद साधत होतो. तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात हा समाधानाचा क्षण होता.

कोरोनाचा देशात शिरकाव झाला तेव्हा परिस्थिती कशी हाताळावी याची कोणालाच कल्पना नव्हती.औषध तेव्हा ही नव्हतं आजही नाहीए. एक दिलासादायक बातमी म्हणजे आता वॅक्सीन आलंय.व्हॅक्सिनेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ९ लाख फ्रंटलाईन वर्कर्स किंवा कोविड योद्ध्यांना लस देण्यास सुरुवात केलीए.

सुरुवातीला एक गैरसमज होता की वॅक्सिनने काही साईड इफेक्ट्स होतात का? पण सुमारे ९ लाख कोविड योद्ध्यांना लस दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचे घातक साईड इफेक्ट्स आढळून आले नाहीत. मी जे राहिलेले कोविड योद्धे आहेत त्यांना विनंती करतो की कोणतेही किंतु-परंतु ना ठेवता बेधडक लसीकरण करून घ्या.

पुढील एक ते दोन महिन्यात काही कंपन्या आपल्याला लसी देणार आहेत. त्यांचं उत्पादन हळूहळू सुरू होतंय, ट्रायल-चाचण्या सुरू आहेत. जसजसा ते त्यांचा कार्यकाळ व कार्यक्रम पूर्ण करतील तशा आपल्याला लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि तेव्हा जनतेसाठी आपण हा कार्यक्रम खुला करून देऊ.

लस घेण्यापूर्वी व नंतरही आपण मास्क घालायला हवा. हे एक युद्धच आहे, वॉर अगेन्स्ट व्हायरस. अजून आपल्या हातात तलवार नाही. व्हॅस्किन धीम्या गतीने येतयं. पण मास्क हीच ढाल आहे. ही ढाल काढली किंवा घालायला विसरलो, तर हा छुपा शत्रू आहेच. काही वेळेला तो आप्तस्वकीयांच्या माध्यमातून वार करतो.

म्हणून आपल्याला विनंती आहे, की मास्क घालणं अनिवार्य आहे. लस घेण्याआधी व नंतरही. लग्न-समारंभात उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध आहेत. हॉटेल्स,दुकानं,रेस्तराँच्या वेळा वाढवल्या,लोकल्स सुरू केल्या,मंदिरं उघडली. त्या काळात आपण सूचनांचं तंतोतंत पालन केलं.आताही आपल्याकडून हीच अपेक्षा आहे

पण आता झालं काय तर करोना गेला असं वाटायला लागलं. पाश्चिमात्य देशांत असंच झालं. सुरुवातीलाच सांगितलं, की लाट येते, मग खाली जाते, परत वर येते. ती खाली जाते तेव्हाच थांबवायचं. आपण अलीकडे जी शिथिलता अनुभवली ती पाश्चिमात्य देशांतही होती. पण तिकडे अनेक देशांत लॉकडाऊन करावा लागला.

कोणी काहीही म्हणो. संसर्गाची साखळी तोडायची असेल, तर संपर्क तोडणे हाच माहीत असलेला मोठा उपाय आहे. पंधरा दिवसांपूर्वी करोना गया, कुछ नही अभी असं वातावरण होतं. तेव्हा दोन-अडीच हजार रुग्ण येत होते. खरंच चांगलं वातावरण होतं. पण ते सगळं तुमचं कर्तुत्व होतं आणि योद्ध्यांची अविरत मेहनत.

त्यांनी अहोरात्र काम केलं. कित्येकांनी जीवही गमावले. त्यांनी जे बलिदान केलं, जे शहीद झाले त्यांच्या मेहनतीवर आपण पाणी टाकायला नको. कोविड योद्ध्यांचा सगळीकडे सत्कार सुरू आहे. आनंद आहे. पण सत्कार करताना किमान एक भावना अशी हवी की आणखी कोविड योद्धे निर्माण करण्याची गरज लागायला नको.

आपण कोविड योद्धे नाही झालात, तरी कृपा करून दूत होऊ नका. एकीकडे कोविड योद्ध्यांचा सत्कार करायचा आणि दुसरीकडे हे उघडा ते उघडा म्हणायचं, असं नको. सामाजिक भान ठेवा. हे युद्ध जिंकण्यासाठी आपण जे करता येईल ते करायला हवं.

आधी दोन- अडीच हजार रूग्ण असायचे. त्यात आता तेवढीच भर पडायला लागली आहे. हे फार विचित्र आहे. आज अमरावतीमधे हजाराच्या आसपास रूग्ण आहेत. तेव्हाच्या प्रमाणात किंवा त्याच्या जवळपास आता रुग्ण सापडत आहेत. आज गलथानपणा केला, तर आकडेवारी किती वाढेल, याची मला चिंता आहे.

आधी रुग्ण आणि आरोग्य सुविधांचं प्रमाण विषम होतं. पण तेव्हाचा जो पिक होता, जे सर्वोच्च शिखर होतं, तिथपासून आता सुरुवात झाली तर आरोग्यव्यवस्थेवर किती ताण येईल. मंत्रिमंडळातले आमचे सहकारीही बाधित होत आहेत. राजेश टोपे जी, जयंत पाटील जी बाधित आहेत. सुदैवाने यशोमती ताई नेगेटिव्ह आल्या.

दोन अडीच हजारांवरून आज महाराष्ट्रात ६९७१ रुग्णसंख्या झाली आहे. मुंबईत जी संख्या ४०० च्या आसपास होती, ती आता ८००-९०० वर गेली आहे. पुण्यातही तीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती म्हणजे तर दुसरी लाट आली आहे का? ती दारावर धडका मारतेय. आली की नाही हे पंधरा दिवसांत कळेल.

उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक मिरवणूका, मोर्चे, आंदोलनं- गर्दी होणारी आणि मोठ्या यात्रा यावर पुन्हा काही दिवसांची बंदी घातली जाईल, कृपया याची नोंद घ्यावी.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवली, तेव्हा आपण घरात होतात. आता ही मोहीम पुन्हा करायची झाली, तर ते अवघड आहे. आता सगळे घराबाहेर आहेत. अशा वेळेस मग या यंत्रणेवर किती ताण द्यायचा. एकाच यंत्रणेवर ताण टाकून आपण बेभान वागायचं हा अमानुषपणा आहे.

मला असं वाटतं, की माझे कुटुंब जशी मोहीम राबवली आणि यशस्वी केली, तशी आता नवी मोहीम सुरू करायला हवी, की मी जबाबदार. प्रत्येकानं मास्क घालायाचा, हात धुवायचे, सगळे सॅनिटाययझर विसरायला लागले आहेत. ते वापरायचं, अंतर ठेवायचं.

लॉकडाऊन करायचा का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. याचं उत्तर आठ दिवसांत मिळेल. आठ दिवस मी बघणार. ज्यांना लॉकडाऊन नको, ते मास्क घालणं, हात धुणं, अंतर ठेवणं अशा गोष्टी पाळतील. बघूया किती जणांना लॉकडऊन हवा आणि किती जणांना नको आहे ते.

मास्क घाला, लॉकडाऊन टाळा

शिस्त पाळा लॉकडाऊन टाळा.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

 


Popular Posts